रोमन संख्या विशेष
Roman Number
विषय - गणित
संख्याज्ञान
रोमन संख्यांची माहिती व्हावी या उद्देशाने ही चाचणी देण्यात आली आहे.
स्कॉलरशिप, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी रोमन संख्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
रोमन संख्यांची माहिती व्हावी या उद्देशाने ही चाचणी देण्यात आली आहे.
स्कॉलरशिप, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी रोमन संख्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
संख्या ज्ञान या घटकांमध्ये सम आणि विषम संख्यांच्या गुणधर्मावर आधारित विविध प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळवण्याच्या उद्देशाने या घटकावर आधारित ही मोफत सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.
त्रिकोणी संख्या = nx(n+1)÷2 → (n = नैसर्गिक संख्या हा तिचा पाया) उदा. 1×2÷2 = 1, 2x3÷2 = 3, 3x4 ÷2= 6, 4x5÷2 = 10, याप्रमाणे
त्रिकोणी संख्या: 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, इत्यादी
नियम - (1) दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. उदा. 1+3 = 4, 3 + 6 = 9, याप्रमाणे
(II) 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्याची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 ते 5 अंकाची बेरीज = 5×6 ÷2=15
(III) त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो.
उदा. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया= 9
कारण 45 x 2 = 90 मधून 81 ही मोठ्यात मोठी वर्गसंख्या जाते. यानुसार √81 = 9
45 ही त्रिकोणी संख्या = 9×10÷2 या सुत्राने तयार झाली आहे.
विद्यार्थी मित्रांनो,
चौथी / सातवी नवोदय, शिष्यवृत्ती,BTS,MTS तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये एक ते शंभर संख्यांवर आधारित संख्या ज्ञानावर विविध प्रश्न विचारले जातात.
या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चारित्र्य चातुर्य संघटन पराक्रम इत्यादींचे बाळकडू देणाऱ्या मा जिजाऊ साहेबांचा जन्म सिंदखेड जवळील देऊळगाव येथील भुईकोट राजवाडा मध्ये 12 जानेवारी १५९८ मध्ये झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा च्या माध्यमातून आदरणीय मासाहेब जिजाऊंना विनम्र अभिवादन.
मुजरा माझा त्या माता जिजाऊला,
घडविले त्यांनी शूर शिवबांना.
साक्षात होत्या त्या आई भवानी
जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी.
1) सर्वांना माझा नमस्कार,
2) माझे नाव .......... आहे.
3) आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत.
4) राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला.
5) त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते.
6) राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
7) पुणे येथील शिवनेरी गडावर त्यांनी शिवबांना जन्म दिला.
8) त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला.
9) दुर्दैवाने राजमाता जिजाऊंनी 17 जून 1674 रोजी अखेरचा श्वास घेतला.
वीर जिचा मुलगा धन्य ती माई,
नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई.
भाषण क्रमांक 02
स्वराज्य ज्यांनी,
घडवला विधाता,
धन्य त्या स्वराज जननी,
जिजाऊ राजमाता.....
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो,
सर्वांना माझा नमस्कार,
आज 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती आपण अतिशय उत्साहाने साजरी करत आहोत. प्रथमतः राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा.
राजमाता जिजाऊ ह्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नाहीत तर त्या खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या जननी होत्या.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांचे वडील लखोजी जाधव हे एक शूर सरदार होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते. राजमाता जिजाऊंना लहान असल्यापासून पराक्रम, धर्मनिष्ठा, स्वराज आणि स्त्री - शिक्षण यांची ओढ होती.
त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला आणि त्या पुण्याला आल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी पुण्याची जहागीर कुशलतेने सांभाळली. त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज पेरले. शिवरायांच्यावर उत्तम संस्कार केले. त्या स्वतः युद्ध कौशल्यात पारंगत होत्या. त्यांनी शिवरायांना शस्त्र विद्येत कुशल बनवले.
राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले. त्यांनी केवळ मुलगा घडविला नाही तर संपूर्ण समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. आज आपण त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे.
जिजाऊ नसत्या तर शिवराय नसते,
शिवराय नसते तर स्वराज्य नसते.
धन्य त्या राजमाता जिजाऊ,
धन्य त्यांची थोरवी,
जय जिजाऊ,
जय शिवराय....
जय महाराष्ट्र .....
धन्यवाद.
भाषण क्रमांक 03
थोर तुमचे कर्म जिजाऊ,
उपकार कधी न फिटणार !
चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार.
सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज मी राजमाता जिजाऊ यांच्या विषयी काही शब्द बोलणार आहे.
राजमाता जिजाऊ यांचे स्मरण केल्याशिवाय स्वातंत्र्य सूर्य छत्रपती शिवरायांचे चरित्र सांगणे कठीणच नव्हे तर अप्रस्तुतही ठरेल. शिवचरित्र घडविण्यात जिजाऊ मातेचे योगदान फार महत्त्वाचे आहे. अशा या महान जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे लखोजी राजे जाधवांच्या घरी झाला इसवी सन १६०५ मध्ये जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. आई ही जगातील सर्वात मोठा गुरु आणि योद्धा असते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल सत्ता चालून होती आणि दिनदुबळ्या जनतेला लुटत होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात शिवबांच्या हाती तलवार, ढाल देत युद्ध कौशल्य शिकण्यास प्रवृत्त केले. फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि एक मुत्सद्दी राजकारणी असे गुण शिवबांना दिले.
स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबांकडून मिळाले होते आणि ते त्यांनी देखील सत्यात उतरविले.
अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आहेत.
अशा या महान मातेस माझा कोटी कोटी प्रणाम.
जय हिंद !
जय जिजाऊ !
जय महाराष्ट्र.